राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, पुढील 2 ते 4 दिवसांत ₹5 हजार कोटी ते ₹10 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
सध्या कर्जमाफीच्या याद्या तयार करण्याचे आणि पात्र शेतकऱ्यांची माहिती तपासण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील काही दिवसांकडे लागले आहे.
पैसे कोणाला मिळणार?
कर्जमाफीच्या निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. आधार क्रमांक, कर्ज खाते आणि संबंधित माहितीची पडताळणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
हे देखील वाचा
👉 कर्जमाफीसाठी KYC कशी करावी? येथे क्लिक करा
👉कर्जमाफी यादीत नाव असूनही त्रुटी दिसत असल्यास काय करावे? येथे क्लिक करा
👉 कर्जमाफी लाभार्थी यादीत नाव कसे तपासायचे? येथे क्लिक करा
👉 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 – संपूर्ण माहिती येथे क्लिक करा
महत्त्वाचे: ₹5 ते ₹10 हजार कोटींचा निधी पुढील 2-4 दिवसांत जमा होण्याची माहिती ही कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर आधारित आहे. प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होण्याची तारीख आणि लाभार्थ्यांची संख्या अधिकृत प्रक्रियेनुसार स्पष्ट होईल.


